Breaking News

एकता कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करावा - धनगर शासन संघटना

 

        फलटण दि.  9 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - झी व अटल बालाजी या टी व्ही चॅनल च्या व्हर्जिन भास्कर नावाच्या मालिके मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने बदनामी झाली आहे,ती मालिका बंद करून संबंधित कंपनी व एकता कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धनगर शासन महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष शंभूराजे शेंडगे यांनी केली आहे.

        झी व अटल बालाजी या टी व्ही चॅनल च्या व्हर्जिन भास्कर नावाच्या सिरीयल मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हॉस्टेल चे नाव दिले आहे व त्यातील प्रसंग दाखवला आहे. अशा प्रकारे नाव देऊन आपमन केला आहे,  तरी निर्मित कंपनीवर बंदी घालावी  व एकता कपूर वर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन फलटणचे तहसीलदार पाटील यांच्याकडे संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.

No comments