फलटण शहरातील नागरिकांची घरपट्टी व गाळा भाडे माफ करण्यात यावे
गंधवार्ता वृत्तसेवा,फलटण - नागरिक कोरोना महामारी मुळे त्रस्त झाले असून त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळली आहे, त्यामुळे फलटण शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करा व लॉक डाऊन मुळे व्यवसाय बंद असल्याने व्यापारीही आर्थिक संकटात सापडले आहे, नगर परिषदेच्या गाळ्यांचे भाडे माफ करावे, अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, नगरसेवक अनुप शहा, नगरसेवक सचिन अहिवळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष वसीम मनेर, माजी नगरसेवक जाकिरभाई मनेर उपस्थित होते.
No comments