Breaking News

ताण-तणाव विरहित परीक्षेला सामोरे जा - दमयंती कुंभार

मार्गदर्शन करताना सौ. दमयंती कुंभार व्यासपीठावर राजेंद्र रणवरे, ताराचंद्र आवळे, चंद्रकांत ढोबळे, पी एन रणवरे, नवनाथ रणवरे

Face the exam stress-free - Damayanti Kumbhar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - शाळेतील प्रत्येक मूल हे वेगळे असते. मात्र या प्रत्येक मुलाकडे वेगवेगळ्या क्षमता असतात या क्षमतांचा विकास होणे काळाची गरज आहे. आपण योग्य दिशेने विचार केला तर योग्य मार्गाने जाता येते त्यासाठी मुलांनी शिकून मोठे झाले पाहिजे व योग्य मार्गाने चालून जीवनामध्ये सकारात्मकता जोपासली पाहिजे.  कोणतीही परीक्षा ही आयुष्यातली पहिली परीक्षा नसून, अशा आपण कितीतरी परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामुळे ताण-तणाव विरहित परीक्षेला सामोरे जा असे मत फलटण  पंचायत समितीच्या विषय तज्ञ व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  सौ. दमयंती कुंभार यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण  येथे इयत्ता दहावी शुभचिंतन व निरोप समारंभ या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी राजेंद्र दौलतराव रणवरे होते, तसेच व्यासपीठावर  प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, प्रमुख वक्ते प्राचार्य चंद्रकांत ढोबळे, पी. एन. रणवरे, एम. एन. रणवरे, नवनाथ रणवरे, जगदेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     सौ कुंभार पुढे म्हणाल्या की आपले आरोग्य जपा कोणतेही काम टाळू नका त्या कामांमध्ये सकारात्मकता शोधा व आनंदाने काम करा आपल्या आई-वडिलांना मदत करा आपल्या शिक्षकाप्रती आदर ठेवा शाळेत आहे तोपर्यंत त्यांची किंमत जाणार व आयुष्याला आकार घ्या. संस्कार व संस्कृती विसरू नका.

     प्रमुख वक्ते प्राचार्य चंद्रकांत ढोबळे म्हणाले की मोबाईल हे सध्याच्या पिढीचे व्यसन झालं असून त्यापासून दूर झाले पाहिजे व अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे आपण आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात करिअर केले तर निश्चितच आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो सध्याच्या काळात कृतीयुक्त शिक्षणाला फार महत्त्व आहे त्यामुळे जीवनाला लवकरात लवकर स्थिरता मिळते तसेच उंची स्वप्ने मनात बाळगून ती सत्तात उतरवण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार करून दर्जेदार मानव बनणे अपेक्षित आहे.

     यावेळी  प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, पी. एन. रणवरे, एम एन रणवरे, नवनाथ रणवरे, पी जे जगताप तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तनया जगताप, जिया तांबोळी, उत्कर्षा रणवरे, वेदिका रणवरे  यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी  विद्यालयास एक चार्जिंग साऊंड सिस्टिम भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई रणवरे, शिफा तांबोळी, सानिया जमादार, जान्हवी ढवळे, अनुजा बोबडे यांनी केले. शेवटी आभार शिवांजली साळुंखे हिने मानले शिक्षक, पालक, ग्रामस्थ,विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments