पप्पु की भी अपनी एक चंपू सेना है - कंगना

कंगणा व कोंग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात ट्विट युद्ध
नरेंद्र मोदींनी कृषी विधेयकासंबंधी केलेल्या ट्विटवर कंगनाने ट्विट केलं होतं. त्यात तिने म्हटलं होतं की, “प्रधानमंत्रीजी कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं नाटक करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र रक्ताचे पाट वाहून टाकले”.
कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्यांना दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर टीका होत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याचे उत्तर ट्विटच्या माध्यमातून दिले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, कंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली असून मोदी सरकार आणि भाजपाच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसीकी रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या ट्विट वर कंगनाने नव्याने ट्विट करत, ज्या प्रमाणे श्रीकृष्णाची नारायणी सेना होती, त्याचप्रमाणे पप्पूची एक चंपू सेना आहे जी फक्त अफवांच्या आधारे लढते. जर माझ्या मुख्य ट्विटमध्ये मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असल्याचं कोणी सिद्ध केलं तर माफी मागून कायमचं ट्विटर सोडून देईन,” असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
No comments