Breaking News

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती! दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य

 

The organic farming revolution started with farmers' efforts! Vision, research and remarkable work of young entrepreneur Sachin Yadav for the welfare of farmers

    भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीचा विचार केवळ पर्याय नसून काळाची गरज बनला आहे.

    ही गरज ओळखून के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सचिन यादव यांनी सेंद्रिय शेतीची व्यापक चळवळ उभारण्याचे ध्येय स्वीकारले. त्यांनी कार्यालयापुरते मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. आधुनिक संशोधन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली.

    के. बी. ग्रुपने संशोधनाधारित, वनस्पतीजन्य आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय खतांची व कृषी उत्पादनांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारण्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास आणि उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होत आहे. सुरक्षित अन्ननिर्मिती आणि निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.

    "प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न" हा केवळ घोषवाक्य नसून श्री. सचिन यादव यांनी स्वीकारलेले सामाजिक ध्येय आहे. रासायनिक शेतीमुळे भविष्यात निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके ओळखून त्यांनी सेंद्रिय शेतीचा जो दूरदृष्टीपूर्ण मार्ग स्वीकारला, तो आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

    राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त अशा दूरदृष्टी असलेल्या कृषी उद्योजकाच्या कार्याचा गौरव करणे हीच खरी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता ठरेल. शेती, पर्यावरण आणि मानवाचे आरोग्य यांचा समतोल राखत सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी श्री. सचिन यादव यांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.

    शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. सेंद्रिय शेतीचा प्रसार, सुरक्षित अन्ननिर्मिती आणि शाश्वत कृषी विकासाचा संकल्प अधिक बळकट करण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सेंद्रिय शेतीच्या या परिवर्तनशील वाटचालीला सलाम!          

- शब्दांकन 
हेमंत खलाटे,फलटण

No comments