Breaking News

श्रीदत्त इंडियाच्या गळीत हंगाम तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ

कारखाना कार्यालयासमोर तोडणी वाहतूक करार प्रसंगी उपस्थित संचालक जितेंद्र धरु व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, साखर कामगार युनियन पदाधिकारी आणि तोडणी वाहतूक कंत्राटदार
Inauguration of Shridutt India's Galit Hangam transport contract

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : साखरवाडी, ता. फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा सन २०२२/२३ या वर्षातील गळीत हंगामासाठीचा ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात वाहतूक कंत्राटदार प्रवीण मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

     दरम्यान, कंपनीचे संचालक जितेंद्र धरु यांनी मागील गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ६ लाख ८० हजार मेट्रिक टन गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण ऊस पेमेंट शेतकऱ्यांना व तोडणी वाहतूक कंत्राटदारांना कमिशन डिपॉझिट सहित सर्व देय रक्कम बँक खात्यावर वर्ग केली असून आगामी गळीत हंगामात कारखाना प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन क्षमतेने चालणार असून एकूण १२ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ठ आहे. त्या अनुषंगाने तोडणी वाहतूक करार सुरु केले आहेत. तरी तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपल्या वाहनाचा करार विभागीय गट ऑफिसशी संपर्क साधून पूर्ण करुन घ्यावा  असे आवाहन जितेंद्र धरु यांनी केले आहे.

    यावेळी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, मुख्य शेती अधिकारी सदानंद पाटील, ऊस पुरवठा अधिकारी दिगंबर माने, को - जन मॅनेजर दीपक मोरे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, सुहास गायकवाड, पै. संतोष भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले, केनयार्ड सुपरवायझर एस. के. भोसले, साखरवाडी गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश भोसले, महेश पवार, राहुल भोसले, राहुल पवार, विशाल बोन्द्रे, सुरेश भोसले, धनंजय भोसले, विश्वजीत भोसले, आकाश जगताप, लालासाहेब ठोंबरे, चिंगोबा होळकर, महेश सुळ, ऊस तोडणी कंत्राटदार व श्री दत्त इंडिया कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments