Breaking News

कृष्णा-भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन प्रकल्पाला निधी देणार ; जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आश्वासन

केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी चर्चा करताना खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर समवेत आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल
    Funding will be made available for Krishna-Bhima Stabilization, Nira Deodhar, Laxmanrao Inamdar Upsa Irrigation Project - Water Resources Minister Gajendrasinh Shekhawat
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, यांच्या समवेत  दिल्ली येथे भेट घेऊन,  कृष्णा -भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर प्रकल्प ,गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना, ( जिहे कटापूर)  माढा  मतदारसंघातील तरुण , बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने मोठा प्रकल्प येण्याबाबत चर्चा केली. विविध प्रश्नावर झालेल्या चर्चे नंतर जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत  यांनी सकारात्मक भूमिका घेऊन, कृष्णा - भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर प्रकल्प ,गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन  दिले. 

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण झाल्यास 22 दुष्काळी जिल्ह्यांना लाभ

     कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना बाबतची संपूर्ण माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली या  प्रकल्पचा पश्चिम महाराष्ट्रातील 22 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये त्याचा लाभ होणार आहे. कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटकला न जाता, ते अडवल्यास  सिंचनाच्या व पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल व दरवर्षी येणारी पूरग्रस्त परिस्थिती  निर्माण होणार नाही. ही योजना पूर्ण झाल्यास ११०  टी एम सी पाणी महाराष्ट्राला जादा  मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण खटाव फलटण या दुष्काळी भागा बरोबर  सोलापूर ,पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, या शहरांना पिण्याच्या पाण्याचा व शेती  पाण्याचा कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली निघेल . तसेच  ही योजना पूर्ण होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जनता व कर्नाटक सरकार हे दोन्ही अनुकूल आहेत, परंतु हा प्रकल्प मोठ्या असल्या कारणाने आत्ताचे  सरकार या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहत नाही. तरुणी आपण यामध्ये लक्ष घालून, या प्रकल्पास, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास या मतदारसंघातील जनता आपली ऋणी राहील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

     पाण्याचा प्रश्न सुटल्यावर या भागातील  बेरोजगारांचा प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी  मार्गी लागेल. विरोधाकानी  या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे .यामध्येही आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली निघण्यासाठी संबंधितांना आदेश देऊन प्रश्न मार्गी लावावा असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

राज्यकर्त्यांनी मुद्दाम नीरा-देवघर प्रकल्प रखडवला

  पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा देवघर या प्रकल्पाबाबत माहिती जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना यावेळी देण्यात आली. 1984 साली या  धरणाची निर्मिती झाली, 2000 साली ते पूर्ण करण्यात आले, परंतु कालव्याची कामे प्रलंबित ठेवण्यात आली. जर ही कामे पुर्ण झाली असती तर  प्रकल्पातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध झाले असते.  माढा मतदारसंघातील तसेच सातारा मतदारसंघातील खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोल्यातील काही भाग  १००  किलोमीटर अंतराच्या लोकांना पाणी पोहोचवणे,  हा त्याचा मुख्य उद्देश आहे.  परंतु   21 वर्षांमध्ये या योजनेस एकशे आठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला व ही योजना रखडवण्यात आली धरणातील पाणी त्यावेळच्या व आत्ताच्या राज्यकर्त्यांनी पाणी स्वतःच्या मतदारसंघाकडे वळवले.  या योजनेस कमीत कमी १०००  करोड ची आवश्यकता आहे. तरी आपण या योजनेस निधी उपलब्ध करून देणे बाबत आपल्या स्तरावर आदेश दयावेत. कारण  या योजनेचे फक्त  21 वर्षांमध्ये फक्त 65 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. या मतदार संघाचे यापूर्वी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी नेतृत्व केले आहे. परंतु हा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक सोडवला नाही, याउलट त्यांनी हे पाणी बारामती मतदारसंघाकडे नेले. महाराष्ट्रात भाजपा सरकार आल्यानंतर  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या यांनी हे पाणी पुन्हा या दुष्काळी पट्ट्यातील लोकांकडे वळवले. परंतु राज्यांमध्ये सत्ताबदल झाला आणि  शरद पवार यांनी पुन्हा हे पाणी बारामतीकडे नेले.  तरी या बाबत मूळ नीरा-देवघर प्रकल्पास निधीची आवश्यकता आहे, तो आपण पूर्ण करण्यासाठी केंद्रातून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व पर्यायी नीरा देवधर प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन द्वारे सुद्धा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माळशिरस, फलटण, सांगोला, पंढरपूर या भागातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल या दुष्काळी भागाचा दुष्काळी हा शब्द कायमस्वरूपी निघून जाईल, यामुळे या मतदार संघातील जनता सदैव आपले ऋणी राहील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करावा

     माण खटाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कटापुर ) केंद्रशासनाच्या जल शक्ती मंत्रालया मार्फत राबवली जात आहे या यामध्ये मान खटाव तालुक्यातील 67 दुष्काळी गावाचा समावेश आहे या प्रकल्पामध्ये 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी १०६१.३४ कोटी अंदाजे खर्च अपेक्षित आहे. त्यास शासनाने मान्यता दिली आहे त्याबाबतचा निधीही प्राप्त झालेला आहे 2020 अखेर या प्रकल्पावर ५८७.६८ इतका खर्च झालेला आहे सद्यपरिस्थितीत जिहे-कठापूर बॅरेज चे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. २०-२१ मध्ये  ०.३५ टीएमसी पाणी साठा करण्याचे नियोजन आहे २०२२-२३ मध्ये  ही योजना पूर्ण कार्यान्वित करून 27500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली  निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने  मधून १०० टक्के निधी  प्राप्त व्हावा अशीही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

No comments