मनातून दातृत्वाची इच्छा महत्त्वाची... योगेश बुवा रामदासी
Donation of Rs. 51,000 to Samarth Seva Mandal from Samarth Bhakt Ravibuwa Acharya
सातारा - जीवनात कार्यरत असताना आपणही समाजाचे देणे लागतो या विचारधारेने जीवनात वाटचाल करणे अतिशय जरूरीचे आहे. समर्थभक्त रवीबुवा आचार्य यांनी समर्थ सेवा मंडळात गेली अनेक वर्षे अव्याहत, अखंडपणे, निरलस वृत्तीने समर्थ सेवा केली. या सेवेतच आनंद मानत स्वतःजवळ साठवलेली आर्थिक पुंजी मला आज पर्यंत समर्थांनी सांभाळले या उक्तीनुसार पुन्हा समर्थ सेवेतच दान केली हे खरोखरच अतिशय आदर्श असे उदाहरण आहे, असे उद्गार श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी काढले .
सातारा येथील समर्थ सेवा मंडळाच्या संत ज्ञानपीठ समर्थ सदन येथे गेली अनेक वर्षे सेवा करणारे समर्थ सेवेकरी रविंद्र रामचंद्र आचार्यबुवा रामदासी यांनी नुकतीच समर्थ सेवा मंडळास 51 हजार रुपयाची देणगी धनादेशाद्वारे अर्पण केली .या छोट्याशा कार्यक्रमात योगेश बुवा रामदासी यांनी वरील उद्गार काढले .यावेळी सज्जनगड येथील श्रीधर कुटी ट्रस्टचे समर्थभक्त गणपती बुवा भट रामदासी, नितीन बुवा जोशी, समर्थ सेवा मंडळाचे समर्थ सदनचे व्यवस्थापक राजू कुलकर्णी यांची उपस्थिती होती .यावेळी बोलताना रवी बुवा आचार्य म्हणाले की मागील वर्षी निवर्तलेले समर्थभक्त आणि मंडळाचे कार्यवाह मारुतीबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली मला समर्थ सेवेची संधी मिळाली. त्यांच्या आशीर्वादाने मी आज पर्यंत ही सेवा देत राहिलो व पुढेही देणारा हे समर्थांची सेवा करताना जमेल तेवढी आर्थिक मदत या सेवेत आपल्याकडून अर्पण व्हावी या इच्छेने ही छोटी देणगी मी धनादेशाद्वारे समर्थ सेवा मंडळाला दान स्वरूपात देताना मला मोठा आनंद होत आहे. आजपर्यंत समर्थांनी मला सांभाळले ते असेच पुढे मला सांभाळतील अशी मी अपेक्षा करतो.
No comments