Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यावरून झालेला वाद दुर्दैवी ; राजकारण करू नये - होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर

त्रकार परिषदेनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत अखिलेशराजे, श्रीमंत अमरसिंहराजे बारगळ यांच्या समवेत पत्रकार आणि उपस्थित मान्यवर

The dispute over the statue of  Punyashlok Ahilyadevi is unfortunate; Don't do politics - Yashwantrao Holkar

        फलटण  - जेजुरी, ता. पुरंदर येथे कुलदेवतेच्या पायथ्याशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे उचित स्मारक उभारले गेले असताना त्याचे अनावरण कोणी केले यावरुन झालेला वाद दुर्दैवी असून यामध्ये राजकारण आणणे हे चुकीचे आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने होत असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात राजकारण असू नये अशी अपेक्षा अहिल्यादेवी होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी केले आहे.

        फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांच्यासह होळकर घराण्यातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कोणा एका समाजाच्या, राजकीय पक्षाच्या, जाती जमातीच्या नसून त्यांचा दृष्टिकोन सर्वांना बरोबर घेऊन सर्वांगीण विकासाचा होता म्हणून त्यांच्या बाबत राजकारण न आणता त्यांच्या आदर्शाची, विचारांची पाठराखण करुन सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन यावेळी यशवंतराव होळकर यांनी केले.

        सर्व समाजाच्या हितासाठी त्यांनी काम केले त्यांचा तो सामाजिक वारसा आमचे घराणे समर्थपणे पुढे चालवीत असून जेजुरी येथे त्यांच्या पुतळ्यावरुन झालेला वाद हा चुकीचा आहे राजकारणात त्यांच्या नावाचा वापर होऊ नये योग्य व्यक्तीच्या हस्तेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण काल आमच्या उपस्थितीत झालेले आहे त्यामुळे हा वाद इथेच थांबवावा त्यांचे नाव घेऊन आरोप प्रत्यारोप करु नयेत असे आवाहन यशवंतराव होळकर यांनी केले.

        आमच्या घराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आम्ही समर्थपणे पुढे चालवीत असून राजकारणात येण्यापेक्षा सामाजिक कार्याद्वारे आम्हाला पुढे यायचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराची व्यापकता सर्वदूर पोहोचविणार असून फलटण तालुक्यातील होळ मुरुम येथे आमच्या पूर्वजांचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्यासाठी आम्ही योग्य ती मदत करु याची ग्वाही यशवंतराव होळकर यांनी दिली.

        धनगर हा एक हिंदू समाज आहे, जो प्रामुख्याने शेती आणि ,पशूपालन व्यवसाय करतो. धनगर समाजामधील लोकांचे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा या राज्यांसह इतर राज्यात सुद्धा वास्तव्य आहे. मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांनी धनगर समाजाच्या हितासाठी व धनगर समाजातील सर्व सामान्य नागरिक पुढे जाण्यासाठी जे काम केले आहे तेच डोळ्यासमोर ठवून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजातील बांधवांच्या उन्नतीसाठी आपण कार्यरत राहणार आहोत या समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती यशवंतराव होळकर यांनी दिली.

No comments