Breaking News

सातारा जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी ला वेग; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

E-KYC of debt relief scheme accelerates in Satara district; 80 percent process complete

    सातारा, दि. 6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३१  हजार ५५६ लाभार्थ्यांपैकी २५ हजार २५९ म्हणजे ८० टक्के शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ६ हजार २९७  म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे, अशी माहिती उपजिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली आहे.

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २७ हजार २८६ लाभार्थ्यांपैकी २२ हजार ३९८ (८२ टक्के) शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून ४ हजार ८८८ (१८ टक्के) लाभार्थ्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे. तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमध्ये ४ हजार २७० लाभार्थ्यांपैकी २ हजार ८६१ (६७ टक्के) शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून १ हजार ४०९ (३३ टक्के) लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.

    प्रलंबित लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments