आसू व मुंजवडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची संजिवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून पाहणी ; नागरिकांना दिलासा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ मे २०२५ : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आसू व मुंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती, घरांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी नुकतीच या भागाची पाहणी करून स्थानिक नागरिकांची भेट घेतली.
नुकसानग्रस्त भागांना भेट देताना त्यांनी शेतकरी व रहिवाशांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. "बाधित लोकांना शासनाकडून व इतर माध्यमांतून तातडीची मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाहणी दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नाईक निंबाळकर यांनी लोकांना धीर देत, त्यांच्या अडचणी शासन दरबारी पोहचवण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, लवकरच मदतीचे वाटप सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments